विषय - शेतकरी जगला तरच देश जगेल
*स्पर्धेसाठी लेख*
*माझ्या भारत देशाची*
*काय सांगू कहाणी*
*कृषीप्रधान देशात*
*कृषीपुत्राच्या जबानी*
भारत देश कृषीप्रधान देश म्हणून फार पुर्वी पासून ओळखल्या जातो आणि आजही तो कृषीप्रधानच आहे , काळ लोटला संपूर्ण जगाने प्रगती केली तशी भारतानेही खुप प्रगती केली परंतु यामध्ये मागे राहिला तो आमच्या देशातील 70 टक्के मध्ये व्यवसायात मोडणारा शेतकरी ,कष्टकरी , मजूर खेड्यापाड्यात राहणारा समाज ..देशातील बळीची परिस्थिती आणि शोकांतीका स्वातंत्र्यानंतरही आहे तशीच आहे .
कदाचित थोडे फार बदल झाले सुद्धा परंतु ते वाखान्याजोगे निश्चितच नाहीत . भारत देश 2020 पर्यंत महासत्ता बनण्याच्या तयारीने पावले उचलतो आहे अन् दूसरीकडे शेतकर्याची दुर्दशा पाहता पाहवत नाही . सकाळीच वर्तमानपत्रात बातमी वाचायला मिळाली "सोयाबीन उत्पादक शेतकर्याची
दिवाळी अंधारात "
कारण ऐन दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन आवक मार्केट मध्ये वाढली त्यामुळे भाव घसरले म्हणून हजारो क्विंटल सोयाबीन मार्केटच्या
आवारात पडून मातीमोल विकल्या जाते आहे .
पंधरा दिवसापुर्वी हंगामात पावसाने थैमान घातले होते त्यावेळी अक्षरशः काही शेतातुन गुडघाभर पाण्यातून माल उपसत कसरत करत कसाबसा माल घरापर्यंत आणला अन् आता मालास भाव कमी , अश्या परिस्थिती मध्ये घाण्याच्या बैलासारखी अवस्था त्याची झालीय.
*नुसता राबत रहा*
*रात्रंदिवस शेतावर*
*दया नाही येत कुणा*
*तुझ्या लेकरावर*
रात्रंदिवस शेतावर राबायचं , तीन चार महीने सतत कष्ट करायचे, घरातलं होतं नव्हतं ते शेतात टाकायचं अन् सुगीची वाट पहायची मनात फक्त स्वप्न रंगवत रहायची , निसर्गाचं लहरीपण सांभाळून मग मालास भाव मिळण्याची अपेक्षा करायची त्यासाठी वाट पहायची आणि शेवटी गरजा पुर्ण होत नाही , लोकांची देणी करायची म्हणून कवडीमोल किंमतीत शेतमाल विकायचा हि आणि अशी लाचार पणाची जिंदगी बिचार्याच्या पाचवीला पुंजलेली .
कष्ट करतो हा , शेतात राबतो हाच आणि टाळूवरची मलई खाणारे मतलबी तिसरेच. त्यामुळेच कि काय घरातल्या जवाबदार्या , पोरांचं शिक्षण , लग्न कार्य , सुख -दूख सारख्या गोष्टी पेलू न शकल्याने निराषे पोटी मृत्यूस उरी कवटाळतो
आहे . हि सद्य आणि खरी परिस्थिती आहे . एकीकडे शासन कोट्यावधी रुपये खर्च वाय फाय फुकट मिळण्यासाठी करतोय आणि दूसरीकडे कृषीप्रधान देशात या शेतकर्याच्या मालास योग्य ती किंमत मिळत नाही याचं दुख होतं .
तेंव्हा मृत्यु पश्चात मदत केल्यापेक्षा जीवंत असेपर्यंत ताठ मानेनं जगूण
कुटुंबाची सेवा करण्याचं भाग्य आणि सन्मान त्याला मिळू द्या. त्यासाठी फक्त भाव योग्य द्या हि त्याची मागणी सुद्धा रास्त आहे .
आणि त्या बदल्यात मरेपर्यंत देशसेवा तो निश्चितच करेल यामध्ये तिळमात्र शंका नाही .
म्हणून म्हणावसं वाटतं शेतकरी जगला तरच देश जगेल अन्यथा उपाशी निजेल तेव्हा ...
*नको नुसते पोकळ आश्वासन*
*ठोस पावले उचलली पाहिजे*
*कृषीप्रधान देशात माझ्या*
*शेतकरी जगला पाहिजे*
प्रा. घनश्याम बोह्राडे
बुलडाना
समुह क्रमांक 19
मो 8308432625
No comments:
Post a Comment