Sunday, 23 October 2016

मीनाक्षी

🌴शेतकरी जगेल तर देश टिकेल🌴

भारत हा कृषीप्रधान देश असूनही शेतकरी म्हणजे काय?कोण?हा प्रश्न आजच्या पिढिसमोर पडतो.कदाचित शेत म्हणजे काय ?हा प्रश्न पुढच्या पिढिसमोर पडेल.शेती म्हणजे काय?शेतकरी म्हणजे काय हेच जर माहीत नसेल तर शेतकऱ्यांचे महत्त्व कसे काय जाणणार?
     सर्व जनतेला  कळत असूनही वळत नाही.भारत हां कृषिप्रधान देश मानला जातो.भारतातील सुमारे 70%जनता उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसायावर आवलंबून आहे.भारतात काम करणारे दोन तृतीयांश लोक शेती अथवा शेती उद्योगांशी संबंधित आहेत .देशाच्या राष्ट्रिय उत्पन्नात शेती व्यावसायाचा वाटा सुमारे 18 ते 20 %आहे.सुमारे 30%जनता अप्रत्यक्षरित्या त्यांच्या अन्न ,वस्त्र ,निवारा या गरजांसाठी शेतीवर अवलंबून आहे.शेतीच्या एकूण उत्पन्नात भारताचा जगात दूसरा क्रमांक आहे.
        कितीही शेतीला नाकारल शेतकामाला कमी लेखल  तरी अजूनही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.भारताच्या आर्थिक, सामाजिक विकासामधे या क्षेत्राची महत्वाची भूमिका आहे.त्यामुळे भारताच्या पंचवार्षिक योजनेमधेही कृषी क्षेत्राला महत्त्व दिले गेले आहे.
     सर्व जनतेला  कळत असूनही वळत नाही.भारत हां कृषिप्रधान देश मानला जातो.
       
भारताच्या  लोकसंख्येपैकी  70 टक्के  लोकसंख्या  शेतीवर  अवलंबून 
आहे .  पण  भारतातील  जनता  मात्र
त्याला  तुटपूंजी  लाचार&  भिकारी
समजते .
    स्वतःच्या  पोटच्या  लेकरापेक्षा
जास्त  जीव  लावून  शेतकरी  काम
करतो &शेतमाल  विकताना  मात्र  त्या  मालाची  किंमत  ग्राहक  किंवा  व्यापारी  ठरवत  असतात.
        म्हणजे  कबाड़कष्ट  करणारा
शेतकरी  त्याच्या  कष्टाला  काहीच  महत्व  नाही.
        जे  ग्राहक  किराणा  दुकान ,मोठ्या  मोठ्या  मॉलमद्ये
कपड्यावर  परफ्यूमवर  अनेक  गोष्टींवर खर्च  करतो & किमतीचा विचार  सुद्धा  करत  नाही.  तोच  ग्राहक  शेतक-याकडून  भाजीची  साधी  पेंडी विकत घेताना रूपयासाठी  भांडतो.हे  का  होते?  तर  माणसाचा  शेतक-याकडे  बघण्याचा  दृष्टिकोण  बदलला  पाहिजे.  
        शेतकऱ्यांचा  महत्त्वाचा  दोष  शेतकरी  संघटित  नाहीत.
      शेतकरी  जर  संघटित  झाले  तर  ज्या  गोष्टी  शक्य  नाहीत  त्या  देखील  शक्य  होतील.  कारण  अख्ख  जग   उत्पादित  केलेल्या  धान्यावर  जगत  असते.  जर शेतक-याने  संप  केला  तर  इतके  अमूलाग्र  बदल  होतील  ज्याची  आपण  कल्पनाही  करु  शकत  नाहीत. 
         डॉ. बाबासाहेब  आम्बेडकरही  शेतकऱ्यांचे  कैवारी  होते.
        शेती हे  केवल  उपजीवीकेचे  साधन  नसुन  राष्ट्रिय  उत्पादन हा भारताच्या उत्पन्नाचा स्त्रोत  आहे.  ग्रामीण  भागाच्या भारताच्या विकासाचा  स्त्रोत  आहे.
खर तर शेतीकडे एक उद्योग म्हणून व् शेतकरी एक उद्योजक या दृष्टीने पाहिले पाहिजे.शासनकडून पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळाल्याने शेतकरी सावकरांचा आधार घेतात .वेळप्रसंगी आत्महत्येचा मार्ग निवडतात.त्यांच्या अन्तापर्यन्त सावकाराच्या पाशातून सुटका होत नाही.सावकार&व्यापारी हे आयत्या बिळातील नागोबा असत.हे सर्व थांबवण्यासाठी शेतकरी वर्गाने संघटित होवून स्वताचे महत्व पटवून द्यायला हवे कारण जोपर्यन्त बाळ रडत नाही तोपर्यन्त आईही आपल्या बाळाला दूध पाजत नाहीत.त्यामुळे वेळोवेळी आपल्याला येणाऱ्या समस्या सरकारपुढे मांडल्या पाहिजेत .माझ्या बळीराजाचे महत्व पटवून देण्यासाठी हे पेजही आपुरे पडेल.शेवटी एवढच म्हणेन,

"जर नाही मीळाली साथ,
तर तो आपल्या प्राणांना मुकेल।
मित्रांनो हे लक्षात ठेवा की,
शेतकरी जगेल तर देश टिकेल।"

मीनाक्षी

No comments:

Post a Comment