Monday, 17 October 2016

मनीषा वाणी, सुरत

।।स्पर्धेसाठी।।

              ।।स्वच्छतेचे महत्व।।

"ए आई,हे काय करतेस? गाडीतून कुणी कचरा बाहेर टाकतं का?जमा कर एका पिशवीत,आपण नंतर उतरू तेव्हा कचऱ्याच्या डब्यात टाकू...."
माझी दहा वर्षांची लेक मला दम देत बोलू लागली.
सुरूवातीला मला ही गोष्ट खुपच खटकली,परंतू नंतर विचार केला,काय वाईट होतं हो तिचं बोलणं?
    अगदी माझी आई असल्या सारखी हक्काने मला माझी लेक सांगत होती.त्याच वेळेला मला खात्री पटली,भारताचं भविष्य खुपच उज्वल आहे.आज प्रत्येक शाळेत स्वच्छते बाबत,पाणी वाचवण्याबद्दल व प्रदूषणा पासून बचाव करण्या बद्दल खुपच सुचना दिल्या जातात.अगदी तीन ते चार वर्षांची मुलं सुद्धा खुपच जागरूक झाली आहेत.स्वच्छता काय आहे व ती कशी ठेवायची ही आजच्या बालकांना पालकांनी सांगायची गरजच नाही.उलट त्या बाबतीत तेच आपले गुरू आहेत.
     ही मानसिकता बदलण्या मागचं काय कारण असावं?हाच विचार,हीच जागरूकता आमच्या वयाच्या व त्या आधीच्या पिढीत का नव्हती?आजची पिढी किती आत्मविश्वासू बनत चाललीय.गाडीत बसल्या बसल्या माझं मन एक वेगळाच विचार करू लागले.
   आपण नेहमी आपल्या मुलांना बोलतो,आमच्या वेळेला असं नव्हतं,आम्ही हेच करायचो,तेच बोलायचो पण खरच का आपण ह्या मुलांपेक्षाही सुधारलेलो आहोत का?त्यांची ह्या वयातली मानसिकता व आपली त्याच वयातली मानसिकता ह्यात जमीन आसमानचा फरक आहे.आपण लहान असतांना दिवसभर बाहेरच हुंदडायचो.घरी फक्त जेवण व झोप ह्यासाठीच यायचो.बाहेरचं जग हेच आपलं विश्व होतं.मातीत खेळणे,बागेत हुंदडणे,तऱ्हतऱ्हेचे मैदानी खेळ आपण खेळत होतो.किती निरागस होतो तेव्हा आपण.त्या वेळी आपण कुठेही थुंकायचो,शु-शी करायला खेळ सोडून घरी कोण जाईल म्हणून आजूबाजूलाच आडोसा शोधायचो,बागेतल्या फुलांना नाजूकपणे हाताळायचं असतं हे सुद्धा आपणास ठाऊक नव्हतं.तसं पाहिलं तर आपण निसर्गाच्या सोबतच जास्त वेळ राहात होतो.परंतू त्या वेळी आपल्या मनास हा प्रश्न कधीच पडला नाही,ह्या निसर्गाची आम्ही काळजी घेतली पाहिजे.कचरा रस्त्यात फेकणं गैर आहे हे सुद्धा त्या बालमनास कळत नव्हतं.शाळेत आम्हाला ह्या बाबतीत वारंवार सुचना देखील दिल्या जात होत्या परंतू आमचं मन ते अंमलात आणत नव्हतं.असं समजा ते करायची आमची मानसिकताच नव्हती.
    बोरं,चिंचा,कैरी व शेंगा खावून झाल्यावर त्या टरफलांचा व बियांचा उपयोग फक्त आणी फक्त मित्र मैत्रिणींना मारण्या साठीच असतो एवढच आपणास माहित होतं.आजकालची मुलं तर प्रत्येक फळांच्या बिया जपून ठेवतात व पावसाऴ्यात मोकळ्या जागी पेरतात.
  हा बदल खरच किती अनपेक्षित आहे.मुलां कडून आपणास ह्या गोष्टींचे ज्ञान मिळते तेव्हा वाटून जातं,त्याच वेळी आमच्या व आधीच्या पिढ्यांनी स्वच्छते बाबत अशीच काळजी घेतली असती तर आज कदाचित आपल्या देशात घाणीचे साम्राज्य कमी दिसले असते,प्रदूषणाचा जन्मच झाला नसता व निसर्गाचा ऱ्हासही झाला नसता.
  खरच हा निसर्ग आपणांस अनादी काला पासून इतकं काही देत आहे परंतू आपण निसर्गाची परतफेड करण्यात अपयशी ठरलो.आज ह्या नैसर्गिक आपत्ती जशा की,पूर,भुकंप व दुष्काळ हे जे होत आहेत त्यास आपलीच मानसिकता कारणीभूत आहे.खरच स्वच्छतेची सुरूवात जर करायची असेल तर सर्व प्रथम आपणास आपल्या डोक्यातला जुनाट कचरा काढून फेकावा लागेल.पुर्वीच्या चुकांची शिक्षा भोगायची तयारी असेल तर कमीत कमी प्रत्येक व्यक्तीने एका वर्षात शंभर तरी रोपं लावली पाहिजेत व कचरा हा कचरा पेटीतच टाकण्याची शपथ घेतली पाहिजे.जर रस्त्यावरती कुणी थुंकत असेल तर लगेच त्या व्यक्तीला एक नागरीकाचे काय कर्तव्य आहे ह्याची जाणीव करून द्यायला पाहिजे.
  "आई,ए आई....अगं हे काय,तू गाडीत बसली आहेस विसरलीस का? आई,तू हातात झाडू असल्या सारखी काय गाडी पुसते आहेस?पप्पा आईची तब्येत बरी नाही वाटतं"माझी लेक चिंताग्रस्त सूरात बोलली.
   मी पटकन पुढे होवून माझ्या लेकिचे चरणस्पर्श केले व तिला धन्यवाद देत बोलले,"आज पासून मी स्वच्छता मोहिम स्विकारली व सुरूवात माझ्या डोक्या पासूनच केली".
   माझ्यातला बदल पाहून लेक खुपच सुखावली व पतीराजांना आश्चर्य वाटले कारण रेडियो वर लता मंगेशकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर गायलेलं गाणं चालू होतं,
"ए मेरे वतन के लोंगो,जरा आंख में भरलो पानी
जो शहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी...."
     खरच आज त्यांची पत्नी, लाडक्या कन्ये समोर नतमस्तक झाली होती व दोन्ही पिढ्या मिळून नवीन व स्वच्छ भारताचं स्वप्नं साकारणार होती.चला तर मग आज सर्व मिळून एक शपथ घेवू,स्वच्छ भारत साकारण्याची प्रतिज्ञा घेवू.

         ।।।जयहिंद,जय भारत।।।

सौ.मनिषा वाणी.@2
सुरत.१६.१०.२०१६.
०९४२६८१०१०९.
mail id-maw7097@gmail.com

No comments:

Post a Comment