Sunday, 23 October 2016

Amol Algude

साहित्य दरबार वैचारिक लेखमाला

*शेतकरी जगला तर देश टिकेल*

शेतकरी म्हणजे काय जो शेतात राबतो तो शेतकरी की जो उन्हात राबतो, तटपुंज्या उतारीसाठी वर्ष घासतो, रानात जीव पेरतो तो शेतकरी स्वताचे लेकर उपाशी ठेवून जग पोसतो तो शेतकरी व्याख्या करण अवघड झालय किंवा आपल्या व्यवसथेन तस अवघड केलय.

स्वताचे लेकर उपाशी ठेवून जग पोसायला या व्यवसथेन मजबूर केलय त्यांना. शेति हा खुप प्राचीन काळापासूनचा व्यवसाय आहे तस हा जगातील सर्वात जुना व्यवसाय आहे पण त्यात योग्य सुधारना झाली नाही स्वातंत्र मिळून 70 वर्ष होत आहेत पण शेतकरी आजही जकडुन आहे.
सततचा कोरडा दुष्काळ, तर कधि ओला दुष्काळ तर कधि बेमौसमी पाऊस यामुळे शेतकरयाला त्याच्या संसारचा गाडा नीट ओढ़ता येत नाही. त्यालाही वाटत असेल की त्याच मूल चांगल्या शाळेत शिक्षण घ्याव. चांगल घर असाव. पण हे स्वप्न त्याच्या शेवटच्या श्वसाप्रयंत पूर्ण होताना दिसत नाही.

भारत हा शेती प्रधान देश आहे अस म्हणतात व ते योग्य ही आहे.शेती व्यवसाय भारतातील 58 ते 65 टक्के लोकांना रोजगार प्रदान करतो. पण हा व्यवसाय करणाऱ्यांची कूटुंबिक परस्थिति कधि सुधरलीच नाही. त्याला तर स्वताच्या मालाचा भाव सुद्धा ठरवायचा हक्क नाही. काहींच्या सौंदर्यप्रसाधनावर जितका खर्च आहे तितकी तर यांची मिळकतही नसते. अस सांगायच कारण ईतकच की खुर्चीच्या पायांची ऊंची समान आसल्याशिवाय खुर्ची स्थिर नसते.

शेतकऱ्याच अख्ख कुटुंब राबुन 5-6 हजार रुपये क्विंटल तुर व हरभरा विकला जातो त्याचिच डाळ पंख्याखाली बसणारे 200 रुपये किलो विकतात आमच इतक चांगल अर्थशास्त्र असेल तर शेतकरयांना न्याय कोण देनार.शेतकरयांच सार अर्थकारण बिघडून गेल आहे.  एक समिति नेमन गरजेच आहे.

'इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो' अस प्रत्येक दिवाळी ला म्हणतो पण राज्य कधी आल नाही त्यांना कायमच गुलाम केलाय या खुर्चीशाहीन. काल परवाच बातमी वाचली शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाचि पाहनी ड्रोन मार्फ़त झाली खुर्चिवर बसुन डाटा मिळवला बर झाल उगीच त्यांना उन्हाचा त्रास कशाला.

महाराष्ट्रात महीना शेकडो शेतकरी आत्महत्या करत आहे ( की व्यवस्था त्यांची हत्या करतेय) शक्येतो हे शेतकरी अल्प भुधारक, दारिद्रय, नापिकि, ओला- कोरडा दुष्काळ, कर्जबाजारीपणा व यातुन येणार नैराश्य ईत्यादिने बेजार होऊन आत्महत्या करत आहेत. या आत्महत्येमुळे हाजारो कुटुंब बर्बाद झाले आहेत.
शेतकरयांचा आत्महत्या रोखन्यासाठी सरकारी इच्छा शक्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी अनेक उपाय योजना करण आवश्यक आहे
.
त्यामुळेच नैसर्गिक संकटात शेतकरयांना तात्काळ मदत मिळण गरजेच आहे. त्यांच्या मुलांसाठी सुलभ बिगरव्याजी शैक्षणिक कर मिळाल पाहिजे. मुलींच्या लग्नासाठी कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध करून दिल पाहिजे. जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. शेतकरयाने मालाचा भाव स्वता ठरवावा व त्याला योग्य बाजरपेठ उपलब्ध केलि पाहिजे, खाजगी कंपन्याचे हजारो करोड़ रुपये कर्जे माफ़ करणारी सरकार संकट समयी का मदत करु नये. सावकारकी नष्ट केली पाहिजे.
अन्न है मूलभूत गरजांपैकी एक आहे त्यामुळे तरी किमन ही गरज भागवणाऱ्या शेतकरयाला सवलती मिळाल्या पाहिजे.
जास्त कष्ट करुन कमी मोबदला मिळणारा व्यवसाय म्हणजे शेति अस झाल आहे त्यामुळे शेतिच आधुनिकरण करण गरजेच आहे या बाबद आपण इजराइल चि मदत घेवू शेकतो.सिंचन क्षेत्र वाडवल पाहिजे पाण्या अभावी अनेक शेतकरी रब्बी पिक घेत नाहीत. बोगस बियाने व खत विक्रिला आळा घातला पाहिजे.
तो जगाचा पोशिंदा आहे  तो जगला आपण जगु .

              अमोल अलगुडे
                     निलंगा
                     स क्र 51
                     aalgude777@gmail.com

No comments:

Post a Comment