Sunday, 23 October 2016

पुष्पा सदाकाळ

स्पर्धेसाठी.

शेतकरी जगला तर देश टिकेल.

           शेतकरी जगला तर देश टिकेल येवढे तरी आता खरोखर च कळू लागले आहे. शासनापासून तर जनसामान्यांपर्यंत सा-यांचेच डोळे उघडू लागले आहेत.पण आता कृती आवश्यक आहे. नुसती बघ्याची भूमिका नको. शासनाने काही ठोस पावले जरी उचलली असली तरी तिचा फायदा तळागाळातील शेतकर्यांपर्यंत पोहोचत नाही. भ्रष्टाचाराचं थैमान  घालणा-यांना हाव सुटत नाही.
      आपला भारत कृषी प्रधान देश आहे. एक प्रगतीशिल राष्ट्र म्हणून ही आज ओळख आहे. सर्व च माध्यमातून प्रगती झपाट्याने होत आहे. शेतीचे ही अवगत तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भरघोस पिके देणारी बियाणे,खते, व अत्याधुनिक साधने आज बाजारात सहज उपलब्ध आहेत. पण या सगळ्या साठी पैसे हवे च ना.हे जर शेतकरी खरेदी करू शकला  नाही तर तो कसा पुढे येणार. गरीब शेतकरी गरीब च राहीलाय. कारण  आजही तो सावकाराच्या देणदारीच्या ,तसेच घरातील वाढता खर्च व उपवर मुलगी या समस्यांमधे पुरता अडकलाय.नैराश्याचं सावट कायमच त्याच्या परीवारात ठाण मांडून असत.खर तर अशा लहान  शेतक-याला सावरायला हव.संकट समयी 2ते 3 लाख देऊन तो मजबूत होणार नाही. त्याला मजबूत करण्यासाठी पहिले पाऊल त्याचे कर्ज माफ.तसेच खते ,बी बियाणे, शेतपंप ,लाईट बिल यात सवलत मिळवून दिली पाहिजे. त्याला शेतकरी राजा आपण म्हणतो मग खरोखर च तो राजासारखा रूबाबात ताठ मानेने जगला पाहिजे.

     नैराश्यापोटी आज आत्महत्येला प्रवृत्त होतात.कुटुंब उघड्यावर येतात.खुप मन हेलवणारी भयावह परीस्थिती असते.पुढे काही मार्ग दिसत नसतो .कधी अवकाळी पाऊस, कर्जाचा बोजा,नापिक ,तर दुबार पेरणी करून ही  निसर्गाची साथ नाही. तर आलेच पिक तर रास्त भाव नाही. आज शेतकरी पुर्ण खचलाय.म्हणून च शेतक-याच्या मुलांना राखीव जागा  नोकरी च्या ठिकाणी आवर्जुन ठेवाव्यात.
      खेड्यात तर सरपंच ,तलाठी, पाटील व सावकार हे लोक या शेतक-यांची उधारी चे उपकार करून खुप पिळवणूक करतात.
स्वस्तात त्याचा माल हडप करतात. हे चित्र आता नक्की च बदलणार आहे.

      आता आपण सावध झालो आहोत. सिमेंटच्या अलिशान घरात राहून व ऐश आराम सोडून माझ्या बळीराज्याच्या घरात नाही तर दारात उभे रहा आणि पहा   माणुसकी. गरीबीची लक्तरं पाघरली असली तरी चहा पाण्याचे स्वागत मनापासून होईल..आपल्याला जराही उन वारा सोसत नाही. त्याची तर बायकामुले रोजच काळ्या आईची सेवा करतात. कष्टांच्या घामाची पोती भरतात.
    जगाचा पोशिंदा च खचला तर राष्ट्र डळमळेल.देशाचे रक्षण करणारे शूरवीर तर इकडे शेतकरी  ही आपली अमूल्य रत्ने आहेत. यांच्या जीवावर आपण सुखात जगतो आहोत. यांना साथ देऊ.
       आता दिवाळी तोंडावर आली आहे. शहरात श्रीमंतीचा डामडौल व थैमान चालते.सजावट,चैनीच्या वस्तू व कपडा असा वायफळ खर्च केला जातो. पण शेतकर्यांची एखादी भाजी घेताना घासाघीस करतो व निवडून घेतो.पाच रू.द्यायला जास्त वाटतात.पण हाॅटेल ,सिनेमा, पिक् निक इथे मागे पुढे पहात नाही. पण आता बदला.शेतक-याला सावरा.त्याला मजबूत करा.त्याच्या मालाला उठाव येऊ द्या. अहो पाच महिने कांदा पिकवून अमाप खर्च व कष्ट करून फक्त 2 रू. किलो भाव.कसा जगेल शेतकरी. 5रू. किलो टोमॅटो. का नाही कर्जबाजारी होणार. स्वतःला सुशिक्षित म्हणणा-यांनी पुढे या.नुसती प्रसिद्धी व डामडौल सोडून  आपण एक जुटीने शेतक-यासाठी मदतीचा हात पुढे करू.काही  ठोस निर्णय घेऊन आंदोलने करू.एकमेकांच्या साथीने शासनाकडून सुविधा मिळवून देवू.कृतीतून साथ देवून त्याचे हात बळकट करू.मग माझा बळीराजा खरोखरीच सर्जा राजांसोबत  आनंदाने जगेल.व कुटुंबाच्या सुखाला मुकावे लागणार नाही. नाही आत्महत्येला धजावणार..
      म्हणून च मी म्हणेन लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये.

     पुष्पा सदाकाळ भोसरी
         @ 50. 9011659747.

No comments:

Post a Comment