Sunday, 23 October 2016

आश्लेषा मोदी

📘साहित्य दर्पण वैचारिक लेखमाला📘

🖋शेतकरी जगला तर देश टिकेल🖋

आपण ज्या देशात रहतो तेथे ७५% लोक शेतीवर अवलंबून आहेत.आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणले जाते.देश कृषीप्रधान आहे पण शेती करणारा खरा देशाचा राजा गंजून चाललाय कर्जाने , शेती करताना येणार्या अडचणी मुळे.
      शेतकर्याला शेती करताना अनंत अडचणीना तोंड द्यावे लागते काही नैसर्गीक तर काही आर्थिक.कधी दुष्काळ कधी अतीवृष्टी यात शेतीचे भरपूर नुकसान होते.जेवढा खर्च झाला तेवढेही उत्पन्न निघत नाही व हताश बळीराजा सावकर्याच्या पाशात सापडतो व अडकत अडकत जातो.व्याज भरता येईल इतकेही उत्पन्न निघत नाही कधी पीक पाणी चांगले झाले तर त्याला भाव मिळत नाही व शेतकर्याला कमी भावात विकावे लागते.
       सरकारने प्रत्येक मालाला एक निश्चित हमीभाव मिळवून दिला पाहिजे.बी-बियाणे,खत रास्त दरात मिळेल अशी व्यवस्था करावी.शेतकरी हा आपल्या देशाचा आर्थिक कणा आहे व तो खचला जाणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.
     आजची ज्वलंत समस्या शेतकर्याची आत्महत्या याकडे भावनिक न होता व्यवहारीक दृष्टीने बघुन असे घडू नये म्हणून ठोस पावले उचलणे खुप गरजेचे आहे.कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणे,निवडक बी-बियाणे,खते सर्वाना
योग्य दरात मिळेल याकडे लक्ष देणे व मालाला हमीभाव या काही महत्वाच्या गोष्टी आहेत .त्याकडे लक्ष दिले तर शेतकर्याला नक्कीच दिलासा मिळेल .
    नैसर्गीक आपत्ती आली तर शेतकरी वर्गाला मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य असले पाहीजे.दलालाकडून माल घेण्यापेक्षा या शेतकरी दादा कडून घासाघीस न करता खरेदी केली पाहीजे.
     शेतकरी जो स्वतः शेतात कष्ट करतो,घम गाळतो व आपल्यासाठी अन्न धान्याचे उत्पादन करतो म्हणजे तोच आपला पोशिंदा आहे.असा हा शेतकरी आनंदात व कर्ज मुक्त जगला तरच देश टिकेल.

पोशिंदयाची ठेवुनी जाण
करुया त्यास कर्जमुक्त..
जगेल तो आनंदाने हे
लक्षात घेण्याचा आहे वक्त..

      55,अश्लेषा मोदी,
         सांगोला
     9405372401

No comments:

Post a Comment